लोकशाही आणि प्रसारमाध्यमे

भारतात लोकशाही टिकवून ठेवायची असेल तर प्रसारमाध्यमे ही प्रबळ (भूमिकेबाबत) असणं गरजेचं आहे. कारण प्रसारमाध्यमे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहेत असं आपण मानतो, परंतु एकंदरित या माध्यमांच्या बातम्यांच्या भूमिकांचा विचार केला तर एखाद्या राजकीय पक्षांर्गत, धर्माधिष्ठित वर्चस्वावर हे मार्गक्रमण करत असल्याचं नक्कीच जाणवतं. खरंतर समाजातील चुकीच्या गोष्टी निदर्शनात आणून त्यावर रोखठोक भूमिका घेण्यात प्रसारमाध्यमांचं प्राबल्य असायला हवं पण परिस्थिती याउलट. नुसतं टीआरपीच्या ओघात चालणं म्हणजे लोकशाहीच्या मूलभुत तत्त्वाला पोखरुन पोखरुन ती संपुष्टात आणण्यासारखं आहे.

-प्रवीण जावळे.

Comments

Popular posts from this blog

सभ्य बलात्कार

भणंग रस्ते - कविता

नास्तिकाचं घर