Posts

राग

आपण ज्यांच्यावर रागवतो ती आपली हक्काचीच माणसं असतात, दूसरे कोणी नसतात. एखाद्या गोष्टीचा राग येणं म्हणजे एकाप्रकारे आपुलकिने काळजी घेण्यासारखंच आहे. -प्रवीण जावळे.

लोकशाही आणि प्रसारमाध्यमे

भारतात लोकशाही टिकवून ठेवायची असेल तर प्रसारमाध्यमे ही प्रबळ (भूमिकेबाबत) असणं गरजेचं आहे. कारण प्रसारमाध्यमे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहेत असं आपण मानतो, परंतु एकंदर...

ती सध्या काय करते. कथा

ती सध्या काय करते..?           वाचन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला होता म्हणून म्हटलं आज पुस्तक वाचावं. तसं पाहायला गेलं तर कोणत्याही गोष्टीसाठी वेळ हा मिळत नसतो तर वेळ काढावा लागतो. तर आज वाचनासाठी वेळ काढला. नेहमीची माझी आवडती, हक्काची जागा...चिमणी उद्यान. या जागेवर जाऊन वाचन करण्याचा आनंद वेगळाच आहे व अनुभवही. या उद्यानाचं खरं नाव 'स्वतंत्र सैनिक उद्यान' असलं तरी ओळख मात्र 'चिमणी उद्यान' या नावानेच होते. या उद्यानाच्या मध्यवर्ती भागात चिमणीच्या आकाराची प्रतिकृती आहे आणि या उद्यानाची कित्येक वर्षापासून निगा राखणारे काका...त्यांनी एकदा बोलता-बोलता सांगितलं की, काही वर्षांपूर्वी या उद्यानात चिमण्या यायच्या. त्यांचा किलबिलाट फार चालायचा इथे. यामुळे या उद्यानाला 'चिमणी उद्यान' नाव पडलं किंबहुना लोकप्रणित पध्दतीने मिळालं. तसेच माझ्या मते 'स्वतंत्र सैनिक उद्यान' खरं नाव देण्यास काही सामाजिक व राजकीय कारणं असतील.           पुस्तक वाचताना त्यात रूळलो तर आजुबाजूला काय होतय हे लवकर लक्षात येत नाही. त...

बोलूया जरा पुस्तकांविषयी.

कोसलन (कादंबरी) - शंकर पाटील कॉलेजला सुट्टी लागल्याने मोकळा वेळ वाचनासाठी देता यावा यासाठी कॉलेज लायब्रेरी गाठली आणि शंकर पाटील यांची 'कोसलन' नावाची मराठी कादंबरी वाचण्...

प्रेमात पडल्याचं लक्षण-कविता

प्रेमात पडल्याचं लक्षण           ठीक २ वर्षे झाली आज. १२ वीची ओरल एग्जाम देऊन आलो होतो. गेल्या काही दिवसांपासून कसल्याचं गोष्टीवर लक्ष लागत नव्हतं. नक्की काय होतंय हे माझ...

'आय लव्ह यू' बोलण्याचा खरा आनंद. ललित लेख

आय लव्ह यू' बोलण्याचा खरा आनंद.   खरा आनंद   हा आपल्याला मिळालेल्या आनंदात नसून; आपण दुसऱ्यांना दिलेल्या आनंदात असतो. माझ्या या मताबाबत मी निश्चित ठाम आहे, कारण आजवर मला आलेल्या वैयक्तिक अनुभवामुळे मी हे सांगू शकतो. मात्र याबाबत इतरांचं काय मत असेल? हे मी सांगू शकत नाही. वर्षभरात अनेक घटना अवती-भवती घडल्या आणि त्यात नवीन असं काही नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात कित्येक घटना घडतच असतात. पण घटनांचं गांभीर्य आपल्याला ओळखता आलं पाहिजे व त्या घटनांतून चांगल्या-वाईट गोष्टी ओळखून शिकता आल्या पाहिजेत. यासंदर्भातली एक घटना माझ्यासोबत नेहमी घडत असते आणि ती घटना प्रत्येकजण अनुभवत असणार...हे नक्की..! तर ती घटना अशी...कॉलेज मधले सगळे लेक्चर्स झाल्यावर तिची आणि माझी भेट दररोज नित्यनियमाने व्हायची. मग त्या भेटीत रोमॅंटिक गप्पा मारत टिफिन किंवा कॅन्टिंगमधली फ्रैंकी, चायनीज भेळ, वडापाव खाण्याचा आमचा बेत ठरलेला असायचा. या दररोजच्या भेटीत नवीन असं काही नसे, यामुळे आज...म्हणजे त्या दिवशी जरा नाविण्य घडावं म्हणून कॉलेजबाहेर जाऊन वडापाव खाण्याचं ठरवलं. कॉलेजपासून ५ ते ७ मिनिटे अंतरावर...

गैरसमज

माणसाने मनात आलेले सगळे संशय बोलून दाखवावेत. ते मनात तसेच ठेवले की गैरसमज तयार होतात.